काही दिवसांतच सलगर चहाच्या अवीट चवीने अनेकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक क्षणी आपली उमेद वाढवणार्या सलगर अमृततुल्य चहाची प्रत्येक शाखेमध्ये एकसारखी चव राखलेली आहे. हा चहा शुद्ध व भेसळमुक्त दुधापासून तयार केला जातो. उत्तम दर्जा असणारी चहापावडर व रसायनविरहित मसाले, साखर वापरुन बनवलेला हा चहा आरोग्यास हानीकारक नाही. या सर्व बाबींमुळे कमी कालावधीत सलगर अमृततुल्यने अनेक चहाप्रेमींच्या मनावर राज्य करत आहे.
चहा तयार करताना त्याची चव जपणे जितके महत्वाचे असते, तितकेच महत्वाचे असते तिथे स्वच्छता राखणे. स्वच्छ व नीटनेटक्या ठिकाणी खाण्या-पिण्याला सर्वांचे प्राधान्य असते. ग्राहकांचे आरोग्य जपले जावे म्हणून सलगर अमृततुल्य चहा तयार करताना वापरली जाणारी सर्व भांडी स्वच्छ असावी याची पुरेपूर काळजी घेतली जाते, तसेच इतर सर्व गोष्टींमध्ये देखील स्वच्छता राखली जाते. यामुळेच सलगर अमृततुल्य चहा अनेकांना प्यारा आहे.